लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यात पवनचक्क्या कंपन्या शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. व प्रशासन दखल घेत नाही. व दखल घेतली तर कंपन्यांना झुकते माप देऊन शेतकर्यावर अन्याय करत असल्याचे व आपल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने गेल्या दोन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. आम्हालाही न्याय मिळवून द्या म्हणून युवराज संभाजी राजे छत्रपती यांना लोहारा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले.