सर्वोच्च न्यायालयाने बजाज अलायन्स पिक विमा कंपनीच्या प्रमुखांना नोटीस काढून पुढील तारखेला व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश

धाराशिव : खरीप 2020 विमा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊनही पीक विमा कंपनी सर्व रक्कम शेतकऱ्याला देत नव्हती म्हणून जिल्हाधिकारी यांच्यासह एकूण तीन जणांनी सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती त्याची आज मंगळवारी सुनावणी झाली.

सुरुवातीला कंपनीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की आम्ही एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पैसे देण्यास तयार आहोत व हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात पाठवण्यात यावे त्यावर आपली बाजू मांडणारे वकील एडवोकेट अतुल डक यांनी कोर्टाच्या हे निदर्शनास आणून दिले की यापूर्वी उच्च न्यायालयाने तीन लाख 57 हजार 287 शेतकऱ्यांना पिक विमा देण्याबाबत निकाल दिलेला आहे पिक विमा कंपनी कन्फ्युज करत आहे.

त्यानंतर न्यायालयाने चिडून कंपनीचे प्रमुख अमित अग्रवाल यांना पुढील तारखेला सर्वोच्च न्यायालयात व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश काढले व अवमान याचिकेवरील नोटीसही काढली. पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवली आहे.

 

आज झालेल्या सुनावणी दरम्यान विमा कंपनीच्या प्रमुखांना अवमान याचिकेबाबत नोटीस काढली असल्याने त्यांना पुढील तारखेला व्यक्तिशः सर्वोच्च न्यायालयात हजर राहावे लागणार आहे जिल्हाधिकारी यांनी मागणी केल्याप्रमाणे 348 कोटी रुपये प्रशासनाला जमा करून ते शेतकऱ्यापर्यंत जातील यात शंका नाही . शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडे पर्यंत संघर्ष चालूच राहील.

अनिल जगताप याचिका करते यांचे समन्वयक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!