लोहारा / उमरगा : उमरगा – लोहारा अनुसूचित जाती करता राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून सन 2024 च्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत समाविष्ट असणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने मी इच्छुक उमेदवार म्हणून उमेदवारी मागत आहे. या अनुषंगाने माझा मागणी प्रस्ताव मी पक्षाच्या जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रमुखांकडे सादर केलेला आहे. असे सामाजिक कार्यकर्ते रमाकांत गायकवाड यांनी सोमवारी लोहारा शहरात आयोजित पत्रकार परीषदेत सांगितले आहे
पुढे बोलताना श्री.गायकवाड म्हण ाले की, आज रोजी भारत देशामध्ये तसेच पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये संविधानिक मूल्यांची पायमल्ली केली जात आहे. समाजामध्ये धार्मिक, जातीय तेढ निर्माण केला जात आहे. विकासाच्या गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी इतर कामाकडे वळवला जात आहे . मानवनिर्देशांकामध्ये आज आपला मतदारसंघ कोठे आहे हा फार मोठा प्रश्न आहे. मूलभूत बाबीच्या अनुषंगाने आज काम केले जात नाही. देशातील आकांक्षीत असणाऱ्या मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे .हे कोणत्या विकासाचे लक्षण आहे.या सर्व बाबींच्या अनुषंगाने मला गेल्या वीस वर्षांमध्ये प्रशासनात व इतर क्षेत्रांमध्ये कामाचा अनुभव आहे या केलेल्या कार्याच्या अनुभवावरती मी ग्रामविकास ,नगर विकास इत्यादी विभागातील कामाबाबत शासनासोबत विविध कामे केलेली आहेत याच अनुभवाच्या बळावरती तालुक्यातील विविध समस्या, प्रलंबित प्रश्न त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी उमेदवारी मागत आहे.

सन 2004 पासून यशदा, पुणे यांचा मी मास्टर ट्रेनर आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, पाणी व स्वच्छता, संवाद कौशल्य, शैक्षणिक धोरण, सामाजिक धोरण, अनुसूचित जाती जमातीच्या अनुषंगाने करावयाचे कार्य, शेतकरी आत्महत्या इत्यादी बाबत मी सबंध जिल्ह्यात काम केले आहे. स्वच्छ भारत मिशन मध्ये काम करत असताना मी केलेल्या कामाचे, शासनाने धोरण स्वरूपात त्याचा स्वीकार केला आहे. त्यामुळे विकासाचा राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या मला अनुभव असल्यामुळे मी उमेदवारी मागत आहे.
आज रोजी उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात पिण्याची पाण्याची समस्या ,रोजगार ,वाहतूक, उद्योगधंदे ,शैक्षणिक प्रश्न ,शाळा खोली बांधकाम , अंगणवाडी बांधकाम, महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाढती गुन्हेगारी, सामाजिक न्यायाचे प्रश्न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, घरकुलचे प्रश्न ,जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर असणाऱ्या परंतु एकही योजना पूर्ण न झालेल्या योजनांचे प्रश्न,विविध समाजांचे आरक्षण बाबतचे प्रश्न, इत्यादी सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने सामाजिक भान असणारा प्रशासनातील चांगली माहिती असणारा व रचनात्मक कार्य करून कृती करणारा मी कार्यकर्ता आहे.
सर्वात महत्त्वाचे सांगायचे म्हणजे मागील 25 वर्षापासून लोहारा शहराचा लोकप्रतिनिधींनी आश्वासित केलेला, आश्वासन दिलेला पंचवीस वर्षापासूनचा प्रलंबित पाणीपुरवठा प्रश्न अशा असंख्य समस्यांचे महानगर बनलेल्या उमरगा लोहारा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने मूलभूत विकासापासून, मानवनिर्देशांकाच्या विकासाच्या व्याख्येपासून कोसो मैल दूर गेलेला आहे. यासाठी या मतदारसंघाला विकसित करण्याकरता ,खऱ्या अर्थाने मी योग्य उमेदवार आहे.

विवेकाची कास धरून केलेली समृद्धी
या उक्तीप्रमाणे कार्य करण्याचा माझा मानस आहे जिल्ह्यातील सर्व महिला बचत गट ,सर्व कंत्राटी कर्मचारी, सर्व कायमस्वरूपी कर्मचारी, विविध संस्था ,सर्व पत्रकार संघ ,विधिमंडळ, युवक मंडळे, मुल्ला मौलवी ,जिल्ह्यातील गवंडी , ग्रामपंचायत कर्मचारी ,तृतीय पंथी , प्रवचनकार, शाहिरीपथके, कृषी मंडळ, त्रिस्तरीय पंचायत राजमधील सर्व सदस्य इत्यादींच्या सोबत मी वीस वर्ष प्रशासनात राहून प्रत्यक्ष काम केले आहे. त्यामुळे फक्त मतदारसंघच नाही तर जिल्ह्यातील सर्व भौगोलिक, सामाजिक, आर्थिक , शैक्षणिक, सांस्कृतिक बाबींचा मला उत्तम अभ्यास असून त्याची मला जाण आहे.भारतीय संविधानाने दिलेल्या न्याय स्वातंत्र्य समता बंधुता व धर्मनिरपेक्षता या पंचसूत्रीमध्ये मतदारसंघाला बांधून खऱ्या अर्थाने संविधानिक मार्गाने आरक्षित असणाऱ्या मतदारसंघात सामाजिक न्यायाची व्याख्या शंभर टक्के उतरवण्याकरिता तिचे संवर्धन करण्याकरता मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. असे ही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.
Back to top button
error: Content is protected !!