धाराशिव

मरावे परी किर्ती रूपे उरावे ; बब्रूवान ( आमदार )

 

मरावे परी किर्ती रूपे उरावे या उक्ती प्रमाणे लोहारा तालुक्यातील भातागळी येथील बब्रूवान रघुनाथ समदळे यांनी आपली किर्ती मागे ठेवून ईहलोकी प्रवास केला. दररोज मजूरी करून उदरनिर्वाह चालवणारा सामान्य माणूसही मनाने अफाट श्रीमंत व दयाळू होता. सामाजिक बांधिलकी जपणारा एक कर्मयोगी होता. सार्वजनिक कार्यक्रम असो की कुणाच्या सुखदुःखाचा प्रसंग असो सेवेसाठी तत्पर हजर राहुन निषःकाम सेवाकार्य पूर्ण करणारा आधुनिक काळातील जणू गाडगेबाबाच. संत मारूती महाराजांच्या सात्त्विक विचारांचा वारसा घेऊन व शंभो महादेवीची कावड डोक्यावर घेऊन शिखर शिंगणापूरची पायी वारी करणारा हा देवमाणुस दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भातागळीकरांना सोडून गेला.

 

भातागळी आणि परिसरात त्यांना “आमदार “या टोपणनावाने ओळखले जायचे. जनसेवेच्या माध्यमातून आमदारकी मिळविलेल्या या महान विभूतीस विनंम्र अभिवादन. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली आसा परिवार आहे. अंत्यविधीसाठी ग्रामस्थ,वारकरी संप्रदाय, व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

बब्रूवान यांच्याबद्दल समाज बांधवांच्या प्रतिक्रिया.

अरेरे अतिशय दुःखद बातमी भातागळीच्या काठीवर निस्सिम प्रेम असणारे सर्वांची मनोभावे सेवा करणारे आणि वारीच्या वाटेवरील सर्वांना परिचित असणारे आणि सर्वांना हवेहवेसे असणारे एक लाडके व्यक्तिमत्व आज आम्ही गमावलं, माझे आणि माझ्या परिवाराचे वैयक्तिक फार मोठे नुकसान झाले अशी माझी भावना आहे. आसबे परिवाराच्या वतीने आणि पायी वारीच्या वाटेवरील सर्व भक्तांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

 

राग, लोभ, मत्सर असले विषय आमदारांपासून कोसो दूर होते. प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होत. जवळजवळ प्रत्येकाच्या घरी त्यांच जाण-येन असायचं. गावात कोणाच्याही घरी कसलाही कार्यक्रम असेल तर आमदार तिथे सर्वात पहिले हजर रहात असत व जेव्हा तो कार्यक्रम संपेल तेव्हा शेवटचं काम होईपर्यंत आमदार जातीने तिथे लक्ष देऊन रहात असत. एकवेळ विधानमंडळातला आमदार होणं सोपं आहे पण बब्रुवान समदळे आमदार होणं सोपं काम नाही. आमदारांसारखा माणूस या गावाला भेटला हे गावाचं भाग्य होत. साक्षात पांडुरंग जिवंत रूपात या भातागळीत फिरत होता असं म्हणताना जराही संकोच वाटत नाही. आमच्या घराचा तर आधारवडच गेला. आमदारांनजवळ कधीच न आटणारा मायेचा झरा होता, आख्या गावावर प्रेम करणारा हा एकमेव माणूस होता. कोणाच्याही घरी जाऊन चहा फराळ करायची मुभा त्यांना होती. गावाने त्यांना जे प्रेम दिल त्यापेक्षा खुप जास्ती तन मन धन त्यांनी गावाला दिल. काठीचे निस्सीम भक्त, कावडधारी, मारुती महाराजांचे भक्त, स्वतः मजुरी करून सप्त्याची पहिली पंगत उठवणारा श्रीमंत माणूस मी आजवर पहिला नाही. आमदार जाऊन अतोनात नुकसान झालंय. ते जी वाट चालले ती वाट चालणं यानंतर कोणालाही जमणार नाही – आमदार होणं सोपं नाही. शब्द पुरणार नाहीत आमदार तुमच्यासाठी.

    शोकाकुल – समस्त भातागळीकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!