धाराशिव

अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा

लोहारा ( धाराशिव ) : उमरगा तालुक्यातील येणेगुर सबस्टेशनचा अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा उपोषण, रास्ता रोको आंदोलन  करणार आहोत असा ईशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
लोहारा येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात सोमवारी (दि.६) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येणेगुर येथील सबस्टेशन येथुन नळवाडी फिडर वरती सुपतगांव, करवंजी, कोराळ, नळवाडी तसेच दाळींब फिडर वरती दाळींब, चिंचोली भुयार, सुंदरवाडी, येणेगुर महालिंगरायवाडी, तुगाव अशा पध्दतीने येणेगुर सबस्टेशन अंतर्गत येणारी गावे आहेत. यापूर्वी आम्ही १० केव्हीए ट्रान्सफार्मरची मागणी केलेली आहे. त्यानुसार आम्हाला १० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवून देण्यात यावा. सध्या नळवाडी फिडरवरती दोन दिवस विज पुरवठा चालु व एक दिवस बंद अशा पध्दतीने विजपुरवठा चालु असूनही लोडमुळे वीजपुरवठा सलग दोन तास सुरळीत चालत नाही, ती वारंवार बंद-चालु होत आहे. तसेच उमरगा ते येणेगुर सबस्टेशनला येणारी मेन लाईन बदलण्यात यावी. सदर प्रकरणी त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासुन येणेगुर येथील सबस्टेशन मध्ये वरील सर्व गावांचे सरपंच व शेतकरी उपोषणास बसणार आहोत. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर रास्ता रोको करणार आहोत. तरीही मागणी पूर्ण नाही झाल्यास दि. १२ फेब्रुवारी रोजी येणेगुर येथील सबस्टेशनला शेतकरी घेराव घालुन सबस्टेशन् बंद पाडणार आहोत असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!