सामाजिक मायेचा स्पर्श , शब्दात न मावणारे व्यक्तिमत्त्व – श्री रमाकांत जोशी सर

‘मराठवाडा समन्वय समिती’ च्या माध्यमातून राष्ट्रीय व सामाजिक सलोखा जोपासणारा ‘मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव ” १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पूर्व संध्येला दरवर्षी बालगंधर्व पुणे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आमचे गुरू, मार्गदर्शक *स्पर्श उपजिल्हा रुग्णालय सास्तुर* येथील प्रकल्प व्यवस्थापक आदरणीय रमाकांत जोशी सर यांना ” *मराठवाडा भूषण”* पुरस्काराने गौरविण्यात आले.खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या रत्नाचा सन्मान केला त्या बद्दल मराठवाडा समन्वय समितीचे आभार आणि जोशी सरांचे खूप खूप अभिनंदन!! सन 1993 मध्ये आपल्या परिसरात प्रलयकारी भूकंप झाला, अनेक गावं जमीनदोस्त झाली हजारो लोकं मरण पावली.त्या वेळेस च्या सरकारने उत्कृष्ठ रित्या काम केले एक चांगले पुनर्वसन केले, घरे दिली, सुविधा दिल्या. सरकार सोबतच अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा आपल्या लोकांना अनेक प्रकारचा मदतीचा हात दिला. त्यापैकी एक म्हणजे कै विपुला कादरी मॅडम ची प्राइड इंडिया संस्था. या संस्थेने एक आरोग्य प्रकल्प सास्तुर येथे सुरू केला त्याचे नाव म्हणजे सेवेसाठी सुप्रसिद्ध असलेले स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर. आणि त्या प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून जबाबदारी एका मौल्यवान हिऱ्यावर दिली आणि तो हिरा म्हणजे श्री रमाकांत जोशी सर. आज त्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे त्याचे सर्व श्रेय या माणसाला जाते. मानवता आणि सेवा धर्म खूप कुटून कुटून भरलेला हा व्यक्ती आहे. गरीब आणि गरजू लोकांची खऱ्या अर्थाने सेवा कशी करायची असते, समाजसेवा काय असते हे पाहायचे असेल तर एक संपूर्ण दिवस जोशी सरासोबत स्पर्श हॉस्पिटल मध्ये राहून बघायला मिळेल. माझ्या लहानपणी आमच्या घरी साईन बोर्ड पेंटींग चा व्यवसाय होता. बोर्ड आणि बॅनर च्या कामानिमित्त 1996 पासून सर आमच्या घरी येतात. तेव्हा पासून जोशी सर आणि मॅडम यांचे आमच्या सोबत कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत. आज आमचा तो व्यायसाय अनेक वर्षापासून बंद आहे तरी सर वेळात वेळ काढून अनेकदा घरी येतात. जोशी सरांच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस सामाजिक कार्याकडे ओढला जाणार यात दुमत नाही. रमाकांत जोशी सर उत्तम प्रशासक असल्याने आज स्पर्श हॉस्पिटल या उंचीवर आहे. इथल्या सुविधा आणि सेवेबद्दल कोणीच सांगायची गरज नाही.
——–
*कोविड काळातील मी पाहिलेले कार्य*
——-
कोविड पहिली लाट सुरुवातीच्या काळात आपल्या भागातील न्हवे तर देशातील 90% हॉस्पिटल्स बंद होते. उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर असल्याने गर्भवती मातांची खूप मोठी गैरसोय झालेली दिसून आली होती अनेकजण घरीच प्रसूती झाल्या कोणीच घ्यायला तयार न्हवते. अशा काळात सुद्धा सरांनी माता व बाल संगोपन खूप जबाबदारीने सांभाळली. माझाच एक अनुभव सांगतो वॉर्डातील एक ताई गर्भवती होती, कुठलाच वाहन चालक मालक, हॉस्पिटल घेवून जायला तयार न्हवता, मला कॉल आला, मी जोशी सराना अडचण सांगितली एक तासात जोशी सरांनी रुग्णवाहिका पाठवली व त्या ताईला घेवून जावून बाळंतपण झाल्यानंतर घरापर्यंत सुखरूप आणून पोहोच केले. *कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच माझे वडील पण कोरोणाने गंभीर आजारी झाले होते सोलापूरच्या मार्कंडेय रुग्णालयात उपचार घेत असताना संपूर्ण 22 दिवस रोज त्या हॉस्पिटल आणि माझ्या संपर्कात राहून त्यांनी केलेली मदत मी आणि माझे कुटुंब कधीच विसरू शकत नाही.* स्पर्श मुळे लाखो गरीब गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळत आहे. कोविड मध्ये मला इदगाह कोवीड सेंटर मध्ये सेवा करण्याची संधी मिळाली होती जवळपास 17 महिने सर्वांच्या सहकार्याने हे सेंटर मी चालवू शकलो. उपजिल्हा रुग्णालय मार्फत इथ पण मोफत आरोग्य सेवा होती तरी पण जोशी सरांनी प्रत्येक रुग्णासाठी प्रत्येक कोवीड सेंटर ला औषधे किट वाटप केली होती. स्पर्श हे पहिले लसीकरण केंद्र होते जे लोकांच्या घरापर्यंत जावून लस देत होते. सरांचे कार्य आणि स्पर्श हॉस्पिटल ची सेवा याबद्दल आपल्या भागातील नागरिकांना मी सांगण्याची गरज नाही. शेवटी एकच सांगेन *रमाकांत जोशी सर म्हणजे शब्दात न मावणारे व्यक्तिमत्त्व आहे.* सराना दीर्घायुष्य लाभो आणि असेच लाखो गरिबांना उत्तम आरोग्यसेवा मिळो. पुढील कार्यासाठी सराना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा !
#marathwada #मराठवाडा_भूषण_पुरस्कार
साभार : फेसबुक