जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही – डॉ. विठ्ठलराव लहाने

लोहारा ( जि.धाराशिव ) : सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कसार च्या वतीने डॉ.विठ्ठलराव लहाने प्लॅस्टिक सर्जन लातूर यांचे भव्य दिव्य असे व्याख्यान आष्टाकासार येथे संपन्न झाले.माणसाच्या जीवनामध्ये संधी सर्वांनाच येते.ही संधी आपला दरवाजा सतत ठोठावत असते. जो कोणी संधीचा फायदा घेईल तो सोनच करतो. डॉ.लहाने यांनी आपल्या जीवनातील संधीचे दोन-तीन उदाहरणे सांगीतली. त्यांच्या व्याख्यानाचे एक वैशिष्ट्य म्हणजे आई वडील विद्यार्थी यांनी जिवना मध्ये कलाटणी मिळण्या साठी काय करावे. अशी अनेक उदाहरणे देऊन सांगितले. आईवर कसे प्रेम करावे.आई अण्णा म्हणजे काय असतात. त्यांच्या सानिध्यात राहील्यास दिवस भरातील थकवा केव्हा जातो तेच समजत नाही.आई सोबत कसे राहावे आणि स्वतः कसे राहतो याचे सुंदर उदाहरणे सांगीतले. माझे अण्णा हवेत चालत होते हवेत. मी अण्णाला म्हटलो की अण्णा तुम्ही हवेत चालत आहात हवेत हवेत. जमिनीवर चाला आण्णा. अण्णांनी यावर सुंदर उत्तर दिले. मी हवेत चालणारच !कारण मी डॉ.विठ्ठलराव लहाने व डॉ.तात्याराव लहाने ही जागतिक लेव्हलचे डॉक्टर आहेत, त्यांचा मी बाप आहे बाप, मग मी हवेत चालणारच. अशा प्रकारेच आपण ही आपल्या वडिलाला अभिमान वाटावा असे कार्य करा. शिक्षण घ्या. शिक्षणाशिवाय जीवनाला कुठलाच पर्याय नाही. असे ते म्हणाले. त्यांच्या व्याख्यानातुन समाजाला एक सुंदर असे जीवन जगण्याची दिशा देणारे अनेक उदाहरण ऐकावयास मिळाली. त्यांच्या गरिबीच्या हलाखीत लोकांच्या रॉखेलच्या दिव्यावर रात्र-रात्र अभ्यास करून मी डॉक्टर झालो आहे. आमच्याकडे रॉकेल साठी सुद्धा पैसे नव्हते. इतकी गरिबी परिस्थिती होती. असे म्हणाले. त्यांचे विचार ऐकल्यानंतर कोणताही मुलगा, मुलगी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमा मध्ये सोडण्याचा विचार सुद्धा करणारच नाही.आई वडिलांबद्दल सांगताना अक्षरश: ते वडिलांच्या आठवणीने ते भावनीक झाले होते.इतक्या तळमळीने डॉ .लहाने सांगत होते. विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, का करावा, केव्हा करावा, याबद्दल स्वतःचे अनुभव सांगून पटवून दिले. त्यांच्या विचारांने आष्टा कासार गावातील वातावरण संस्कारक्षम निर्माण होईलच. अशी गावातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रत्येकाच्या तोंडात लहाने डॉक्टरांचीच चर्चा चालु आहे. आयुष्यामध्ये अशा वक्त्यांचे विचार ऐकल्या नंतर गावचा कायापालट, परिवर्तन, शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय राहणारच नाही.या व्याख्याना साठी आष्टा कासारच्या महीला वर्ग,विद्यार्थी,असा बहुसंख्येने जनसागर उसळला होता. भोसगा, तुगाव, अचलेर, हंगरगा, अणदुर, जेवळी,आलुर, मुरुम, लोहारा, उमरगा व परिसरातील बहुसंख्य जनता व शिक्षकवृंद आणि असंख्य विद्यार्थीगण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा उपसरपंच श्री वसंतराव सुलतानपुरे गुरुजी, उपाध्यक्ष विष्णु सगर गुरुजी होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिव सिद्रामप्पा तडकले गुरुजी यांनी तर सुत्रसंचलन कुडुकले सर यांनी केले. कार्यक्रमा पूर्वी सुनील माने, प्रविण चिचंंनसुरे यांच्या सुराने वातावरण मंत्रमुग्ध बनले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलसुरे,कडते, अण्णाराव पाटील, बनसोडे,बचाटे, शिदोरे, आळंगे,गोसावी, फुंड्डीपल्ले, सोमवंशी, पोतदार व इतर सर्व शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन मनोहर वाघमोडे यांनी मांडले.