विमा कंपनीची 50 कोटी रुपये रक्कम उपलब्ध ; लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होणार याचिकाकर्ते – अनिल जगताप

लोहारा ( जि.धाराशिव ) : खरीप 22 मधील विमा ननुकसान भरपाई पोटी राज्य शासनाकडे येणे असलेली विमा कंपनीची 50 कोटी रुपये रक्कम उपलब्ध. लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होणार याचिका करते अनिल जगताप यांची माहिती.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून खरीप 2022 मध्ये केवळ पन्नास टक्केच रक्कम वितरित केली होती याविरुद्ध शेतकरी अनिल जगताप यांनी राज्य तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर राज्य तक्रार निवारण समितीने उर्वरित 294 कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याबाबत विमा कंपनीला आदेशित केले होते.

तीन महिन्याचा कालावधी लोटूनही विमा कंपनी ती रक्कम देत नव्हती म्हणून अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आग्रह धरून पिक विमा कंपनीवर महसुली कारवाई करण्यास भाग पाडले होते त्यानंतर कंपनीने धाराशिव जिल्ह्यात 232 कोटीचे वितरण सुरू केले आहे मात्र विमा कंपनीचे राज्य शासनाकडून 50 कोटी रुपये येणे बाकी होते त्यामुळे मोहा, आनाळा, सोनारी, पाडोळी ,सावरगाव ,सलगरा ही सहा महसूल मंडळे पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई पासून वंचित ठेवली होती.

याबाबत राज्य शासनाकडे अनिल जगताप यांनी पाठपुरावा केल्यानंतर कृषी विभागाने निधी मागणीची फाईल अर्थ खात्याकडे सादर केल्यानंतर निधी मंजूर करून कृषी आयुक्त कार्यालय यांच्याकडे 50 कोटी रुपये वर्ग केले आहेत सदरील रक्कम सोमवारी विमा कंपनीकडे जाईल तिथून ते पैसे प्रधानमंत्री नॅशनल पोर्टल वरती जाऊन सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील यासाठी आचारसंहितेची कुठलीही अडकाठी राहणार नाही.

धाराशिव जिल्ह्यातील सहा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 50 कोटी रुपये रक्कम उपलब्ध करून देता आली यासाठी आपल्याला मनातून आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अनिल जगताप यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!