शेतकऱ्यांना एस डी आर एफ व एन डी आर एफ अंतर्गत तातडीने मदत करावी – सामाजिक कार्ययकर्ते अनिल जगताप

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एस डीडी आर व एफ एन डी आर एफ अंतर्गत तातडीने मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्ययकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना ईमेल निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढून राज्यातील 40 तालुक्यात गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले आहे. त्यात मराठवाड्यातील 14 तर धाराशिव जिल्ह्यातील तीन लोहारा ,वाशी, धाराशिव या तालुक्याचा गंभीर दुष्काळ असलेल्या तालुक्यात समावेश आहे दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नियमाप्रमाणे एस डी आर एफ व एन डी आर एफ अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.
त्यानंतर देखील शेतकऱ्याची ओरड झाल्यानंतर दहा नोव्हेंबर 23 रोजी राज्य शासनाने 1091 महसूल मंडळी दुष्काळ सदृश्य परिस्थिती लागू केली होती व त्यांना देखील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्या प्रमाणे सुख सवलती मिळतील असे जाहीर केले होते मात्र अद्याप पर्यंत कसलीही मदत मिळालेली नाही.मध्यंतरीच्या कालखंडात केंद्राच्या पथकाने पाहणी करून धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ असल्याचा सकारात्मक अहवाल दिल्याचे समजते.

मात्र विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव जिल्ह्यातील लोहारा धाराशिव वाशी या तालुक्यातील शेतकऱ्यांना एस डी आर एफ व एनडीआरएफ अंतर्गत निधी मागणी मंजूर झाली असून ती मंत्रालय स्तरावर आत्ता प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळे तीन तालुके वगळता इतर तालुक्याचे काय होणार आहे प्रश्न शेतकऱ्यापुढे निर्माण झालेला आहे.

यावर्षी जाहीर केलेली शासकीय मदत पुढीलप्रमाणे असेल
जिरायत क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित फळपिके 22 हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादित याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील बळीराजासाठी साठी निधी मागणी पुढील प्रमाणे आहे.

लोहारा तालुक्यातील शेतकरी संख्या 34 हजार 197 इतकी असून त्यांना जिरायत बागायत व फळ पिके यासाठी 46 कोटी एक लाख रुपये ची निधी मागणी आहे.
धाराशिव तालुक्यातील शेतकरी संख्या ८५३०० इतकी असून त्यांची निधी मागणी 118 कोटी 67 लाख इतकी आहे.
वाशी तालुक्यातील शेतकरी संख्या 37 हजार 933 इतकी असून त्यांची निधी मागणी 43 कोटी 81 लाख इतकी आहे.
याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील एक लाख 57 हजार 466 शेतकऱ्यांना 208 कोटी 50 लाख रुपयांची निधी मागणी आहे परंपरेनुसार जी निधी मागणी असते त्यात कसलाही बदल न करता ती मंजूर केली जाते त्यामुळे या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांनाच एस डी आर एफ एन डी आर एफ ची मदत मिळणार का हाही प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एकूण 57 पैकी 46 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. अद्यापही अकरा महसूल मंडळात तो जाहीर होणे बाकी आहे.

जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असल्याने शासकीय नियमानुसार एस डीआरएफ वएनडीआरएफ अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री महोदयाकडे केली आहे निधी मागणीचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून मंत्रालयात गेल्याची ही समजते त्यावर तातडीने निर्णय होऊन धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती त्यांना केली आहे.

अनिल जगताप सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी धाराशिव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!