शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचं आमरण उपोषण सुरु

उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील यांनी सोमवारपासुन आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मागणीसाठी कैलास पाटील यांनी उस्मानाबादमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं आणि पीकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
त्यामुळे आ. कैलास पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या मदतीचे 1200 कोटी रुपये थकित असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे.