लातूर – उमरगा रोडवर नारंगवाडी येथे रास्ता रोको ; अनिल जगताप यांची माहीती

उमरगा : उमरगा तालुक्यातील नारंगवाडी महसूल मंडळाचा 25% अग्रीम रक्कम देण्याच्या यादीत समावेश करण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी लातूर उमरगा रोडवर नारंगवाडी चौक येथे भव्य रस्ता रोको आंदोलन राष्ट्रवादीचे अनिल जगताप यांची माहिती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की काल 11 सप्टेंबर रोजी नारंगवाडी महसूल मंडळाच्या परिसरातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी माननीय श्री गणेश पवार उपविभागीय अधिकारी उमरगा ,माननीय तहसीलदार उमरगा माननीय पोलीस निरीक्षक उमरगा यांची उमरगा येथे भेट घेऊन नारंगवाडी महसूल मंडळाचा समावेश पंचवीस टक्के अग्रीम रक्कम देण्याच्या यादीत करावा अन्यथा 18 सप्टेंबर रोजी नारंगवाडी चौक येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे.

चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांनी एक सप्टेंबर रोजी अधिसूचना काढून धाराशिव जिल्ह्यातील 57 पैकी 36 महसूल मंडळाचा 25% अग्रीम देण्याविषयीच्या यादीत समावेश केला असून या 36 महसूल मंडळांना एक महिन्याच्या आत त्यांच्या मंडळातील नुकसानीच्या टक्केवारीनुसार भरपाई द्यावी असे अधिसूचना जारी केलेली आहे. मात्र दुर्दैवाने नारंगवाडी महसूल मंडळाचा त्यात समावेश नाही नारायणवाडीसह एकूण 21 महसूल मंडळे या मदतीपासून वंचित राहणार आहे.

चाकूर ता.उमरगा येथे अनिल जगताप यांचा सत्कार केल्यानंतर ही बाब तेथील शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर गतीने हालचाली होऊन काल रीतसर तहसीलदार उमरगा, उपविभागीय अधिकारी उमरगा व पोलीस निरीक्षक उमरगा यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहेत.

खरं म्हणजे यापूर्वीच 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अप्पर मुख्य सचिव कृषी श्री अनुप कुमार, मंत्रालय मुंबई यांना एक अहवाल पाठवून जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा वास्तव त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले होते दिलेल्या अहवालात त्यांनी म्हटलं होतं की वीस वर्षातील सर्वात कमी पाऊस असून अडीच मिलिमीटर पावसाची नोंद व 21 दिवसाचा खंड ह्या अटी अतिशय जुलमी असून त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे तसेच 21 महसूल मंडळामध्ये 60 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

संभाव्य उत्पादनात घट येणार आहे त्यामुळे या महसूल मंडळांना देखील अग्रीम देणे योग्य राहील असा अहवाल दिलेला आहे

मात्र दुर्दैवाने यावर अद्याप पर्यंत कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे नारंगवाडी, नाईचाकूर, कवठा, पेठ, सांगवी, गुगळगाव, मातोळा यासह त्या मंडळातील 16 गावांनी 18 सप्टेंबर रोजी रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

याबाबत शासन पातळीवर या संदर्भात काही निर्णय होतो का नाही हे पाहणे महत्त्वाचे असेल अन्यथा त्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी बांधव 18 सप्टेंबरला नारायणवाडी येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!