वाटप आणि वाटप नोंद…

जमिनीचे वाटप म्हणजे सहहिस्सेदारामध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देणे होय. वाटप तीन पद्धतीने केले जाते.
(१)महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप.
(२)दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप.
(३)दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून.
या तिन्ही प्रकारे वाटप करताना तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत जमिनोपेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा करता येत नाही.
वाटप हे त्या जमिनीमध्ये जे वारस आहेत त्यांच्यातच करता येते, इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही, वाटप तोंडी केले जाऊ शकते पण नंतर असे वाटप नोंदणीकृत करावे लागते.
(१) तहसीलदारासमोर वाटप- याप्रमाणे वाटप करताना सर्व हिस्सेदारांची संमती लागते, सर्वांची संमती असल्यास फक्त जबाब घेऊन वाटप मंजूर केले जाते, यासाठी खूप कमीखर्च येतो.
(२) दुय्यम निबंधकासमोर वाटप- याला नोंदणीकृत वाटप असे म्हणतात, नोंदणीकृत वाटप करताना सर्व हिस्सेदारांची संमती लागते व वाटपाचा दस्त बनवते वेळी सर्व हिस्सेदार रजिस्टर ऑफिसमध्ये हजर लागतात, या वाटपासाठी ठराविक मुद्रांक शुल्क असते, अश्या वाटपासाठी स्टॅम्प (चलन),टंकलिखित वाटपपत्र,नोंदणी शुल्क यासाठी थोडा खर्च येतो.
(३) न्यायालयातून वाटप- सहहिस्सेदारामध्ये वाद असल्यास दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप करावे लागते, यासाठी दावा दाखल करून त्याची नोंदणी करावी लागते, प्रतिवादीना नोटीस काढली जाते, प्रतिवादी आपाली कैफियत मांडतात, पुरावे सादर करतात, त्यानंतर न्यायालयाचा निकाल दिवाणी प्रक्रिया संहिता 1908,कलम 54 नुसार जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवलाजतो, जिल्हाधिकारी रीतसर वाटपासाठी प्रकरण तहसीलदाराकडे पाठवतात, तहसीलदारामार्फत प्रकरण भूमिअभिलेख कर्याल्याकडे वर्ग केले जाते, भूमिअभिलेख कार्यालय अर्जदाराकडून मोजणी शुल्क भरून घेऊन मोजणी करतात, यानंतर वाटप तक्ता तयार करून तहसीलदाकडे पाठवला जातो तहसीलदार सर्व संबंधितांना नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे विचारात घेऊन वाटप मंजूर करतात.
तुमचाच,
ॲड.आविनाश चिकटे
“जिल्हा व सत्र न्यायालय पुणे”
Whatsapp-9923237287
Call- 8530760999