कोट्यावधीच्या जमीन खरेदी कवडी मोलाने लोहारा तालुक्यातील पवनचक्की कंपन्यांचा धुमाकूळ – संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष बालाजी यादव

लोहारा : लोहारा तालुक्यातील पवनचक्की प्रकल्पाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होत असल्याने याबाबत स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी जनतेतून होत आहे लोहारा तालुक्यात अनेक गाव, शिवारात पवनचक्की प्रकल्प मोठ्या प्रमाणातवर झाले आहेत आणि आणखीही जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून या भागात हे प्रकल्प उभे केले जात आहेत. ज्या जागेत तांत्रिक योग्यता असते ती जमीन कंपन्या खरेदी करतात. या कंपन्या शेकडो प्रकल्प उभे करून करोडो रुपये कमावत आहेत पण शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करत आहेत सर्वप्रथम या कंपन्यांनी तीन ते चार लाख रुपये एकर प्रमाणे जमिनी खरेदी केल्या आता सध्या मात्र सहा ते सात लाख रुपये एकर प्रमाणे खरेदी करत आहेत रस्त्यासाठी उद्योगासाठी जमिनी अधिग्रहण करताना शासकीय दराच्या चार ते पाचपट दराने जमिनी खरेदी केल्या जातात याच नियमानुसार या जमिनी कंपनीने घेतलेल्या पाहिजेत वास्तविक पाहता या कंपन्या वाणिज्य वापराकरिता या जमिनी खरेदी करत आहेत व त्यावर करोडो कामावर कमावत आहेत.मग शेतकऱ्यांच्या जमिनी कवड्डी मोल किमतीने कशा खरेदी केल्या जातात यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे .या प्रश्नावर आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधी कंपन्यांना सवाल विचारला नाही यामध्ये काय साठे लोट आहे याबाबत संशय व्यक्त केला जात आहे याबाबत शासकीय स्तरावर सुद्धा कोणते नियम आहेत. त्यांची पूर्वता होते कि नाही यासाठी कोणताही विभाग हे पाहण्यासाठी तयार नाही त्यामुळे कंपन्या हम करेसो कायदा हे तंत्र वापरताना दिसत आहेत. अगोदर जमिनी खरेदी करताना ज्या शेतकऱ्यांची जमीन कंपनी घेईल त्यांच्या घरातील एका व्यक्तीस नौकरीत सामावून घेण्याचे आश्वासन कंपन्याने दिले होते. पण असे काही घडले नाही कंपन्याचे काम चालू असताना स्थानिक लोकांना रोजगार देणे आवश्यक असताना सुद्धा परराज्यातील मजुरांकडून कामे केली गेली याबाबत अनेक शेतकऱ्यांनी व तालुक्यातील मजुरानी तक्रारी निवेदने दिली परंतु या पत्राताना केराची टोपली दाखवली गेली पवनचक्क्याची उभारणी केली जात असल्याने पर्यावरणाचे संतुलन ढासळत असल्याचा इशारा मागेच सॅंटर फॉर सायन्स अँड एनव्हारोन्मेंट संस्थेच्या (सीएसई) अहवालातून देण्यात आला होता संस्थेने केलेल्या पाहणीत महाराष्ट्रातील पवन ऊर्जा प्रकल्प वन जमिनी आणि डोंगराळ भागावर उभारण्यात आल्याने पठारी प्रदेशांच्या तुलनेत जलस्त्रोत आणि पर्यावरणाला अधिक किंमत चुकवावी लागणार आहे गेल्या सात वर्षापासून ही स्थिती उद्भवली आहे पर्यावरण परिणामाचे सखोल विश्लेषण सिएसईच्या अहवालातून करण्यात आले असून यांचे दुष्परिणाम अधिक प्रमाणात होत असल्याचे आढळले आहे साधारण शंभर ते दीडशे मीटर उंचीवरील जे व्यवसायिक पवन ऊर्जा प्रकल्प मानवी वसाहतीच्या जवळ आहेत त्याच्यां मुळे ध्वनी प्रदूषण होत आहे यांच्या सर्वाधिक परिणाम वटवाघळांच्या प्रजातीवर झाला असून पवनचक्क्यांच्या परिसरातील हवेचा दाब कमी जास्त होत असल्याने वटवागळांची प्रजाती प्रचंड प्रभावित झाली आहे देशभरातील पवन ऊर्जा प्रकल्पांचे सर्वेक्षण करताना सीएसई संस्थेने स्थानिक रहिवाशांना विजेचा पहिला हक्क देण्याची आवश्यकता ही नमूद केली आहे या परिसरातील जेवढ्या प्रमाणात पवनचक्की प्रकल्प झाले त्यापासून तयार होत असलेली वीज मात्र सोलापूर जिल्ह्याला देण्यात आली आहे त्यामुळे वीज मिळण्याचा पहिला हक्क लोहारा तालुक्याला असताना सुद्धा वीज दिली गेली नाही त्यामुळे हे प्रकल्प बंद करण्याची मागणी सर्व नागरिकांनी केली आहे अनेक ग्रामपंचायत हद्दीमध्ये हे प्रकल्प उभे आहेत त्यांना नाहरकत कशा पद्धतीने दिली तसेच या कंपन्या वर्षीक ग्रामपंचायत कर भरतात की नाही. याबाबत ही ग्रामीण भागात अनभिज्ञता असल्याचे दिसून येते. त्यामुळे कंपन्यांना कशाची ही काळजी करण्याची आवश्यकता नाही पवनचक्क्यांच्या उभारणीने हवेचा दाब जलस्त्रोतांचे संकुचन आणि त्या परिसरातील मानवी वस्त्या तसेच निशाचर प्राण्यावरही प्रणाम होत असल्याचे एका पाहणीत आढळले आहे ज्यावेळी या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करतात त्यावेळी आमचे टॉवर फक्त दहा गुंट्यात तयार होते बाकीचे जमीन तुम्हालाच वापरायला मिळते अशी लालूच दाखवतात. त्यामुळे शेतकरी हातोहात फसतो. त्यामुळे असे प्रकल्प आमच्या तालुक्यात नको, जर करायचे असतील एकरी पन्नास लाख रुपये प्रमाणे पैसा द्या आणि विजयीही याच तालुक्याला द्यावी अशी मागणी आमची आहे आमच्या मागण्या पूर्ण व शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर. आम्ही संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका पवनचक्कीला जो जाणारा रस्ता आहे तो रस्ता उकरून टाकणार यांची नोंद घ्यावी. त्वरित लक्ष न दिल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईल ने उत्तर देऊ.संभाजी ब्रिगेड लोहारा तालुकाप्रमुख शिवश्री बालाजी भागवत यादव
संभाजी ब्रिगेड प्रसिद्धी प्रमुख शिवश्री स्वप्निल बालाजी गुंड खंडू शिंदे शरद जावळे सत्यजित मुसांडे अमोल बिराजदार पदमाकर चव्हाण लक्ष्मण पवार अभिजित सुर्यवंशी किरण सोनकांबळे किशोर बिराजदार
विजय जाधव ओमकार चव्हाण अब्बास कारभारी लक्ष्मण लोहार गणेश सुरवसे अनंत पवार संजय खरूसे निवेदनावर आदिच्यां स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!