गुरु पोर्णिमा उत्सवानिमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम

जेवळी ( ता.लोहारा )

जेवळी येथील श्री गुरू सिध्देश्वर विरक्त मठात सोमवारी (ता.३) गुरु पोर्णिमा उत्सवा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्ताची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्ती भागात असलेल्या या परिसरात वीरशैव लिंगायत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. वीरशैव धर्मातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा जोपासण्यासाठी अध्यापही येथे मठ परंपरेला महत्त्व आहे. भूकंपात जेवळी येथे प्राणहानी बरोबरच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाले होती. यात येथील बेन्नीतुरा नदीकाठी असलेल्या श्री गुरु सिद्धेश्वर विरक्त मठाचे ही नुकसान झाले होते. जेवळी गावच्या पुनर्वस्नानंतर येथील दहा वर्षांपूर्वी परिसरातील भावी भक्तांनी एकत्र येत जवळपास सव्वा कोटी रुपये लोक वाटा गोळा करून आधुनिक पद्धतीने मठाची निर्मिती केली आहे. आता येथे वेळोवेळी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. सोमवारी (ता.३) गुरूपौर्णिमा निमित्त मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी सात वाजता येथील श्री विरभद्र मंदिरात रूद्राभिषेक, आठ वाजता श्री गुरूपाद पुजा, मंगल आरती, भजन या नंतर भाविकांना श्री गुरू गंगाधर महास्वामीजी यांचे दर्शन- आशीर्वाद, सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील सात- आठ हजार भाविक भक्त दर्शन व महाप्रसादासाठी उपस्थित राहिले.

या प्रसंगी दिवसभरात आमदार ज्ञानराज चौगुले, मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, उपसभापती बसवराज कारभारी, लातूरचे माजी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सिद्रामप्पा खराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, माझी तालुका समन्वय नागांण्णा वकील, अणदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिवंत साखरे, नगरसेवक हरी, पंचायत समितीचे माजी उप सभापती गोविंद पाटील, व्यंकट कोरे, माजी उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शंकरांण्णा जट्टे, पंचायत समितीचे माजी सदस्य उल्हास घुरघुरे आदी गुरुपोर्णिमा निमित्त उपस्थित राहत आशिर्वाद घेतले या उत्सवासाठी सीमावर्ती कर्नाटक- महाराष्ट्र भागातील जेवळीस लोहारा, विलासपुर पांढरी, सय्यद हिप्परगा, वडगाव, वडगाव वाडी, फनेपूर, सुपतगाव, खेड व्होर्टी, एकुर्गा कर्नाटकातील सिंदूर, अंबुलगा गुलबर्गा आदी ठिकाणाहून भाविक भक्त उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिसरातील भाविक भक्तांनी तन- मन- धनाने पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!