प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने अनेक विकासाचे कामे – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

इक्बाल मुल्ला
मुरुम (ता.उमरगा ) /प्रतिनिधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने अनेक विकासाचे कामे करण्याची संकल्पना आखली आणि ते संकल्पना गेले ९ वर्षात पूर्णत्वाकडे घेऊन गेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने मोदी @ ९ या कार्यक्रम महा जनसंपर्क अभियान अंतर्गत उमरगा- लोहारा तालुक्यातील लाभार्थ्यांचा भव्य मेळावा मुरूम शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थिती दि.26 जुन 2023 रोजी घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांनी भाजप सरकारच्या 9 वर्षाच्या काळातील झालेल्या कामाबाबत माहिती देत, गेले 60 – 70 वर्षांपासून विकासापासून वंचीत असणाऱ्या देशाला 2014 सालापासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने अनेक विकासाचे कामे करण्याची संकल्पना आखली आणि ते संकल्पना गेले 9 वर्षात पूर्णत्वाकडे घेऊन गेले. अनेक पक्ष येतात विविध आश्वासने देतात मात्र जनसामान्यांचे विकासात्मक कामे तसेच प्रलंबित राहतात, भाजप हा एकमेव पक्ष असा आहे, ज्यांनी आश्वासने दिली आणि त्या आश्वसनाप्रमाणे कामे केल्याची महा-जनसंपर्क अभियानातून नागरिकांना संपर्क साधून आपल्या कामाचा आढावा मांडते, असे सांगितले. यावेळी प्रमुख म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि. प.माजी अध्यक्ष तथा जिल्हा संयोजक नेताजी पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस संताजी चालुक्य, युवा नेते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अभय चालुक्य, विधानसभा निवडणूक प्रमुख राहुल पाटील, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, सुनील माने, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, भाजपा उमरगा तालुकाध्यक्षा कैलास शिंदे, उमरगा तालुका संयोजक तथा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत मिनियार, तालुका उपाध्यक्ष चंद्रशेखर मुदकण्णा, मुरुम शहराध्यक्ष गुलाब डोंगरे आदि, उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात 2019 मध्ये जनतेने भाजपा सरकारला निवडून दिले होते, मात्र शिवसेनेने त्यांच्याशी गद्दारी केल्याने महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. अशा पाठीत खंजिर खुपसनाऱ्याना गाडून परत एकदा राज्यात आणि केंद्रात भाजपा सरकारला स्पष्ट बहुमताने विजयी करून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी अवहान करीत मोदी @9 म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कारकीर्दची माहिती दिली. यावेळी आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष काळे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तर बंजारा समाज महिला भगिनीच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री मंत्री मिश्रा यांचा सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात अंबरनगरचे माजी सरपंच गोपाळ चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह तसेच उमरगा – लोहारा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत मिनियार व सूत्रसंचालन प्रा.दत्तात्रय जाधव, यांनी केले तर आभार चंद्रशेखर मूदकण्णा यांनी मानले. या कार्यक्रमास अल्पसंख्याक मोर्चा उमरगा तालुकाध्यक्ष निसार मदरसे, प्रसाद मूदकण्णा, उमरगा तालुका चिटणीस सागर पाटील, उमरगा तालुका चिटणीस लोकेश बिराजदार, लोहारा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, लोहारा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, लोहारा तालुका सरचिटणीस तथा तालुका संयोजक नेताजी शिंदे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, युवा मोर्चा उमरगा तालुकाध्यक्ष पिंटु साखरे, युवा मोर्चा लोहारा तालुकाध्यक्ष शुभम साठे, विरेश गुंडगोळे, शरणप्पा मुळे, सिद्धू हिरेमठ सुनील निलवाडे, जाकीर जमादार, व्यंकट चौधरी, बबलू महाबुसे, आकाश क्षीरसागर, किसान मोर्चा उमरगा तालुकाध्यक्ष अमर करके, महताब तांबोळी, अजय वाले, नितीन पाटील, पं.स. माजी सदस्य वामन डावरे, महादेव कोरे, काशीनाथ घोडके, युवराज जाधव, यांच्यासह महिला, नागरिक, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.