लोहारा / उमरगा (जि.धाराशिव ) : चालू खरीप हंगामात चांगला पाऊस झाला असून सोयाबीन, उडीद, मूग यासारख्या शेतमालाचे उत्पादन मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खाजगी बाजार समितीमध्ये सद्या सदरील धान्याचे दर खुपच कमी असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आपले शासनातर्फे केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पादीत सर्व कडधान्य व तेलबियांची शासकीय हमीभावाने खरेदी प्रक्रिया राबविण्यात येऊन शासकीय हमीभाव खरेदी केंद्र लवकरात लवकर चालू करणे बाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पणन व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली. यावेळी किसन पाटील, बालाजी पोद्दार, राजेंद्र माळी आदि जण उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!