वेळ अमावस्याला शेताकडे जात असताना किमान एक माणूस आपल्या घरी ठेवा – पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, उद्या 23 डिसेंबर रोजी शुक्रवार वेळ अमावस्या असल्याने, सामान्यतः प्रत्येक गावातील, प्रत्येक परिवार आपापल्या शेतात जाऊन सण साजरा करतात. त्यामुळे शेतात जात असताना काळजी घेण्याचे अवाहन पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.
1.आपल्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने दागिने व इतर मौल्यवान वस्तू शक्यतो सोबत घेऊन जावे.
2. आग्रहाची विनंती कि किमान एक माणूस आपल्या घरी ठेवावा.
3. घराला व्यवस्थित कुलूप लावावे.
4.आपल्या घराची व दाग दागिन्याची काळजी आपणच घ्यावी.
5. संशयित इसम आढळून आल्यास तत्परतेने आपल्या पोलीस ठाणे येथे संपर्क करावा.
6. चोरापासून सावध रहा.
श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक