एस.बी.आय. फाउंडेशन मुंबई कडून विकास कामाची पाहणी

किल्लारी / प्रशांत नेटके

एस.बी.आय.फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयाने समाजिक दायित्व निधीतून औसा तालुक्यातील तपसे चिंचोली, गाडवेवाडी, लाडवाडी, गाडवेवाडी तांडा व गांजनखेडा या पाच गावामध्ये ग्रामसेवा कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे. या अंतर्गत गावामध्ये शाळा संगणिकीकरण , पाणी शुद्धीकरण केंद्र, विद्युतीकरण, महिला सक्षमीकरण, उपजीविका विकास, स्वच्छता, बायोगॅस आदी विकास कामे झाली आहेत. या कामाची एस.बी.आय फाउंडेशन मुंबईचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल काठेवाड यांनी पाहणी करत समाधान व्यक्त केले.


यावेळी दिलासाचे सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अंतरयामी करजे, समन्वयक बापू कदम, राहुल घुळे, विकास भरती, पद्माकर तौर, मैनु पठाण , शिवदास स्वामी, लाडवाडीतील बचत गटाच्या महिला व नागरिक आकाश सातपुते, सुनील राठोड,रामप्रभू तौर, विजयकुमार तौर, अभिषेक तौर, अजित तौर, ज्ञानदेव तौर, लक्ष्मण तौर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!