विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार शिक्षण दिले पाहिजे – शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे

जेवळी, ता.१ ( ता.लोहारा ) : 

विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार शिक्षण दिले पाहिजे, ताण तणावाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या आधुनिक शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांबरोबर पालखी जागृत असायला पाहिजे असा सल्ला लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे हे जेवळी येथे बोलताना दिला

जेवळी (ता लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दयानंद कापसे हे तेत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. जिल्ह्यात शिक्षण विभागाबरोबरच इतर शासकीय विभागात उत्कृष्ट संगणक तज्ञ व प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक होता शुक्रवारी (ता.३०) यांच्या श्री बसवेश्वर विद्यालयाच्या सांस्कृतिक मंचावर मठाधीश मनिप्र श्री गंगाधर महास्वामीजी यांच्या सानिध्यात निवृत्तीचा सत्कारा पार पडला. यावेळी लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे हे बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेवळी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक भुसणे हे होते. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक बी पी माळी, गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी ,मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शामससुंदर तोरकडे, माजी सरपंच चंद्रकांत साखरे, पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धिमत्ता साखरे, माजी उपसरपंच मल्लिनाथ डीग्गे, सुभाष बिराजदार, संस्थेचे उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे, खजिनदार, गुरुलिंगप्पा कानडे, शालेय समितीचे सभापती इराप्पा डिग्गे, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष मल्लिनाथ वेलदोडे, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज बिराजदार, शिव बसव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव कारभारी, युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष शिवराज चिनगुंडे, मुख्याध्यापक वाय. एस. कांबळे, पर्यवेक्षक एम. सी. चौधरी, श्रीमंत कारभारी, दत्तात्रेय गाडेकर आदीसह नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील तर आभार एस एस कारभारी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!